खरं प्रेम एकदाच होतं,ते कधीही विसरता येत नाही!!शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ,अनेकांवर पसरता येत नाही....
माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............
हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...
मंगळवार, २६ जानेवारी, २०१०
आपल्याला वेडू म्हणणारं
वेडू म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं.
एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय.
माझ्या वहीचं एक पान
कोरच राहून गेलं
आता वही जुनी झाली पण
त्यावर लिहायचच राहून गेलं.
विसरलेलं सगळं
पुन्हा आठवतं
सगळं विसरलोय
हे आठवलं की.
असे बेसावध क्षणच
सावधपणे टाळायचे असतात
जवळ येताना दुराव्याचे
काही नियम पाळायचे असतात.
पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहाणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पहाणारा.
पिंपळाचं रोप कसं
कुठेही उगवतं
कुठेही उगवतं म्हणून
त्याचं कसही निभावतं.
वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
की मी लगेच जाणार आहे.
मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.
गुरुवार, २१ जानेवारी, २०१०
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे.....
माझ्या कृष्णाची राधा होणच आवडेल मला
एक आयुष्य सोबत घालवण्यापेक्षा
युगांसाठी तुझी होणच आवडेल मला
राधे सारख आधी माझ नाव
हा ध्यास मुळीच नाही........
पण तुझ्या सोबतीने प्राणसख्या
सदैव रहायच आहे मला
तू फ़क्त माझा व्हावास
असा हट्टाहास नाही करणार मी
पण माझ्यात फ़क्त तूच असशील
इतकच अभय दे मला .....
जग काय म्हणेल
याची चिंता किंचितही नाही
पण तू मात्र अंतर देऊ नकोस
या तुझ्या वेड्या राधेला ......
मी अशीच आहे
मी आहेच अशी मैत्री करणारी
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारी
प्रत्येक मित्राचा विश्वास जपणारी
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावानरी
मी आहेच अशी सतत बोलणारी
मित्राना नको ते प्रश्न विचारानरी
प्रश्न विचारुन त्याना सतावानरी
उत्तरे संग म्हणुन
तगादा लावणारी
मी आहेच अशी मस्त जगनरी
सदानकदा स्वप्नामद्ये रमणारी
आपल्यातच आपलपन जपणारी
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरानरी
मी आहेच अशी मनासारख जगनरी
यशाचे शिखर चदताना हाथ देणारी
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवानरी
मी आहेच अशी सर्वांच ऐकनारी
आई वडील याना देव मनानरी
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारी
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारी
मैत्रि
कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी,
मी आनन्दात असताना हसने तुझे असावे,
तु दुखःत असताना अश्रु माझे असावे,
मी ऎकाकी असताना सोबात तुझी असावी,
तु अबोल असताना शब्द माझे असावे.......
मी कोण?
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.....
मंगळवार, १२ जानेवारी, २०१०
Color of Love
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली
मैत्री
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात.......
मनाला काही संगुन जातात
जरी दुसर्या गोष्टीत रमले
तरी तुजी उणीव भासवून जातात
तरवल मनाच्या या स्थितिला
शब्दात उतर्वायाच
पण ओठावर आलेले शब्दही
चटाकन निसटून जातात
काळात नाही अस करून
शब्दही का तुजीच उणीव भासवातात
या धुंदिताच वाटल लिहावास
ओठातुन निसतनार्या शब्दाना पकदावास
जरी शब्दाना पकडून बंदिस्ता केले
तरी तुज्या उणिवेने घायल केले
या धुंद लहरी
मनाला काही संगुन जातात
जरी दुसर्या गोष्टीत रमले
तरी तुजी उणीव भासवून जातात
तरवल मनाच्या या स्थितिला
शब्दात उतर्वायाच
पण ओठावर आलेले शब्दही
चटाकन निसटून जातात
काळात नाही अस करून
शब्दही का तुजीच उणीव भासवातात
या धुंदिताच वाटल लिहावास
ओठातुन निसतनार्या शब्दाना पकदावास
जरी शब्दाना पकडून बंदिस्ता केले
तरी तुज्या उणिवेने घायल केले
कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही,
तुला आधाराची नितांत गरज असताना
निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही,
कातरवेळी दूर जाणार्या वाटेकडे पाहूनही
मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही,
नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना
तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही,
जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं
तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं,
निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना
कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं,
माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
विसरुन जा जिवलगा सार्या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे....
सोमवार, ११ जानेवारी, २०१०
का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान,
त्याच्या दूर जाण्याने ?
भेटीनंतरही का .....
भेटण्याची आस असते ?
त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये
का रात्र सारी हरवते ?
त्याने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं
प्रत्येक छोटी गोष्ट ही
त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं
कळलं का तुम्हाला, अचानक
असं वेड्यासारखं का होतं ?
दुसरं काही नाही .........
यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "
तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर
डोळ्यांनी नव्हे तर
शब्दांनी सारं स्पष्ट कर ||१||
सल्ला आवडला माझ्या मनाला
उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला
नंबर तिचा फिरवला
मनाचा समतोअल बिघडला
खरंच का तु सांगु शकशील
तिच्या मनांत नसलं तर
उगाच चांगली मैत्रीण गमावशील
मनाची ही बाजु मनालाच पटली
एक बेल तिच्या फोनची वाजली
नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली
दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली ||२||
असंच का तु जगशील
सांगितल्याशिवाय मानातलं तिला
कसं तु समजावशील?
भावना तुझ्या सा-या मनातल्या
सांगणं तुला नकार या पैकी
एकच उत्तर तुझे आहे ||३||
मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं
सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं
लढाई फारच लांब रंगली
दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली
सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली
उचलुन फोन करावा हीच
बाजु मनाला पटली ||४||
उशीर करणे योग्य नव्हते
फोन करणे जरुरी होते
सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली
लगेचच बेल होनची खणखणली
हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं
आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं
कुशल मंगल सारं विचारलं
विषय कसा काढु हेच नाही
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"
ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"
"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।
"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"
"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास...
माप ओलांडून आले होते मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो
कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात
पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....
आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं
कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी
म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर.......
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
' ए आपण असे कसे रे
ना रंग , ना रूप ,
नेहमीच चिडीचुप ,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर ,
दु : खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर ,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला ,
किनारा ही नाही साधा या पापण्याला ............
दुस - यालाही मग जरा प्रश्न पडला ,
खुप विचार करून तो बोलला ,
रंग - रूप नसला तरी ,
चिडीचुप असलो जरी ,
आधार आपण भावनांचा ,
आदर राखतो वचनांचा ,
सान्त्वनांचे बोल आपण ,
अंतरीही खोल आपण ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे ,
दु : खाच्या प्रसंगी आपलेच महत्व ,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत ,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत ,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा ,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा ,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा ,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच ,
आपले बाहेर पड़णे भाग आहे ,
आपल्यामुलेच आज हे जग आहे .
अशीच आपली कहाणी .........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
तू
एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....
तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....
तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....
तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...
तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी .....
तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ........
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!
किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!
कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
फक्त ती सुखात राहायला हवी......!!!!!
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी......!!!!!
प्रेम
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता
प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती
पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली
काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली
काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?
रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो
करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे
तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे
आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!
प्रेम
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा
माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे
कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान
पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान
कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव
कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले
कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला
कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर
कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ
आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?
पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्याच्या विश्वात रमंणे
क्षण.......
ह्रुदयात जपुन ठेवायचा
या क्षनाची किम्मत
तेव्हाच कळते जेव्हा
निघून गेलेला असतो हा क्षण
आपल्या आयुष्यातून
आयुष्य सुरु होत ते
या क्षनातुनाच आणि
संपत ही या एका क्षनातच
हा क्षनच असा असतो
जो संपतो एका क्षनाताच
हा क्षनच घेऊन जातो
आपल्याला प्रतेक क्षना पासून दूर
क्षनाची किंमत करण्यासाठी
तो क्षण अनुभवावा लागतो...!
मैत्रिण
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!
मैत्री
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.
कधी केवळ एक क्षणाची भेट पण खुप आनंद देउन जातात , आठवणी मागे ठेउन जातात..
कोण कुठली व्यक्ति त्या गोष्टी गौण असतात. त्यांच्याशी खर तर कुठलाच ह्रणानूबंध नसतो .
पण कुठेतरी एक अनामीक ओढ असते मग ती भेटीची असो, नुसतेच बोलण्याची असो किंवा त्यांच्या सुखाची असो ... ती आपुलकी म्हणा ते जे काही असते ते मग काहीही असो ..
त्यांच्या सुखासाठी आपल्या मनात एक संवेदना नक्कीच असते; कारण ते काळजाच्या वाटेने आयुष्यात आलेले असतात.
बरेच वेळा अश्या संवेदनांना नात्यात बांधणे हे त्या अनामीक नात्यासाठी धोक्याचे असते . त्यांना नात्यात बांधण्याच्या प्रयत्नात त्यातील संवेदना आपूलकी ओढ सगळ संपुन जाते.म्हणुनच ते जे काही आहे ते तसेच अनुभवावे ..
कारण त्यातच त्याचा गोडवा टीकुन आहे.
म्हणून मी नेहमीच म्हणतो की ...
हजारो मैलांचा प्रवास करून येणार्या लाटांची आणि किनार्याची भेट असते काही क्षणांची ...
तशीच मैत्री कर माझ्याशी ..पण ओढ असु देत हजारो मैलांची ।
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........
पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाहीl
मित्र
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.
काही माणस....
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात
आयुष्यात पुढे सरकत राहा..
मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते
मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते
अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात
अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात !
हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची !
नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण !
आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे !
आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो !
खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामक राक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा....
आज म्हटल आयुष्य विणायला घेउया............
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे
मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु
सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम
मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल
एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती
मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी
एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला
सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते
थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख
मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे
अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही
महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला
साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत
एक असंही प्रेम होतं…
“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’
“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो, तर ती खूप सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’
“मग?’
“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत… म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत. तुला सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…; पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’
“आम्ही आपल्या नेहमीच्या जागी भेटलो. तिचा चेहरा मलूल दिसत होता. फारसं बोलली नाही ती. मी विचारलं तिला, “काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की?’ तर ती म्हणाली, “तेच बोलायला आलोय आपण; पण आधी काहीतरी खाऊन घे… नेहमीप्रमाणे उपाशीच असशील…’ मग आम्ही खायला मागवलं; पण ती नीट खात नव्हती. नेहमीप्रमाणे माझ्या डिशमधला घासही घेतला नाही तिनं… अन्न चिवडत बसली होती फक्त… तुला गंमत सांगतो, आज यांचं काहीतरी बिनसलंय हे आमच्या नेहमीच्या वेटरच्याही लक्षात आलं… त्यानं तसं विचारलं सुद्धा… माझं खाणं झाल्यावर ती म्हटली, “चल पुलावर जाऊ…’
काय झालंय हे माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ती काही बोलायला तयार नव्हती… आम्ही पुलावर जायला निघालो. आज बिल तिनं दिलं… तुला ठाऊक आहे, नेहमी बिल मीच देतो. पण आज तिनं मला अडवलं आणि पैसे काढून दिले.
आम्ही पुलाकडे जायला निघालो. ती गाडीवर मागे बसली होती ना, तेव्हाही नेहमीसारखी नव्हती बसली. माझ्या खांद्यावरच्या तिच्या हाताची थरथर मला जाणवत होती… माझ्यासमोरचं प्रश्नचिन्ह वाढतच होतं…
आम्ही पुलावर पोचलो. मी गाडी लावली आणि आम्ही खाली बसलो. ती मान खाली घालून बसली होती. तिला म्हटलं, बोल आता… काय झालंय ते सांगून टाक पटकन. आता माझा जीव नको खाऊस… तिनं वर पाहिलं, तर डोळ्यात पाणी होतं तिच्या… तिनं पर्स उघडली आणि मला एक पासबुक दिलं. “हे तपासून घे,’ म्हणाली. तुला माहीत नाही… मी तिला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचो. तिनं एक अकाउंट उघडलं होतं, त्यात ती ते भरायची. त्यात स्वत:चीही भर घालायची. आमच्या संसारासाठीची बचत होती ती!
ते पासबुक हातात घेतलं आणि विचारलं, “काय भानगड आहे ही? मी तुला आजपर्यंत त्याबाबत कधी विचारलंय का? आणि आज एकदम हे काय?’
तिनं माझा हात हातात घेतला… तिचा हात थरथरत होता. मी त्यावर थोपटलं… पाच-दहा मिनिटं आम्ही तसेच स्वस्थ बसून राहिलो. मी तिला थोपटत होतो. तिनं मला विचारलं, “तुझा विश्वास आहे माझ्यावर?’
मी म्हणालो, “मग कोणावर ठेवू?’
ती म्हणाली, “आपण लग्न नको करायला… का ते विचारू नकोस. मला नाही सांगता येणार; पण आपण लग्न नको करायला…’
ती काय म्हणते आहे, हे मला कळलंच नाही कितीतरी वेळ… समजलं तेव्हा कशाचंच भान नव्हतं राहिलं. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि आहे. ती तसं म्हणते यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार… पण असं कसं होईल… ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय कसे जगू शकू..? अक्षरश: काही समजत नव्हतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच सुन्न बसून होतो नदीकडे बघत आणि ती नदी आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहात होती. बराच अंधार पडल्यावर आम्ही उठलो. तिला घरी सोडलं… आणि मी इथं तुझ्याकडे आलो…’
“अम्या, असं कसं होईल रे… ती का म्हणाली असं? तू विचारलं नाहीस तिला? मी विचारू का?’
“नको. तू काही बोलू नकोस. मीही कधीच विचारणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर काहीतरी नक्की घडलंय…’
“अरे पण आपल्या ग्रुपला काय सांगायचं आता? आणि तू तुझ्या घरी काय सांगशील?’
राहुलच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत अम्या नव्हताच. तो केव्हाच हरवून गेला होता. अम्या हरवला होता, त्यापेक्षा राहुल जास्त हरवला होता. हरवणारच होता तो… तो धक्काच तेवढा मोठा होता… अम्या आणि मनू काही थोडा काळ एकमेकांसोबत नव्हते. लहानपणापासून ओळखत होते ते एकमेकांना. फक्त ओळखत नव्हते, तर एकमेकांशिवाय ते कुठंही जात नव्हते की येत नव्हते. भांडणं आणि मारामाऱ्याही तेवढ्याच जोरदारपणे करायचे. बरं दोघांच्याही शाळा वेगळ्या आणि पुढे कॉलेजही वेगळी; पण एका शिबिरात ते भेटले आणि तेव्हापासून एकमेकांचेच झाले होते. हे जे काही आहे, त्याला प्रेम म्हणतात, हे त्यांना दहावीच्या सुटीत जाणवलं. ते पैसे साठवण्याचं खूळ तेव्हापासूनचं होतं. अर्थात त्यावेळी मनू एका पिगी बॅंकेत पैसे टाकायची. अम्याच्या कॉलेजचा ग्रुप हसायचा कधीकधी त्यांना… चेष्टाही करायचा; पण त्यांना त्यांच्या प्रेमाची, त्यांच्यामधील गाढ नात्याची जाणीवही होती. थोडीथोडकी नाही, 12-14 वर्षं दोघं एकत्र होते. कॉलेज संपल्यावर ती नोकरी करू लागली आणि हा व्यवसायात पडला. तेव्हाही याची अकाउंट्स तपासणं, तो जेवला की नाही पाहणं यावर तिचं पक्कं लक्ष असायचं. त्यांची ती शेवटची भेट होती, तेव्हाही तिनं आधी त्याला खायला लावलं होतं… अम्या कधी कसा वागेल, हे तिच्याइतकं कोणीच सांगू शकायचं नाही आणि तिच्याबाबत अम्याला विचारून घ्यावं. अम्या केव्हा रागावतो, त्याला काय काय आवडतं इथपासून ते आत्ता त्याच्या गाडीत किती पेट्रोल आहे, तो बाहेरगावी गेला, तर किती वाजता कुठे असेल, घरी किती वाजता पोचेल इथपर्यंत बारीकसारीक गोष्टी मनूला माहिती असायच्या. तशाच मनूच्या त्याला. दोघं एकमेकांची प्रचंड काळजी घ्यायचे. कॉलेज वेगवेगळी असली, तरी अम्यानं कधी कोणती लेक्चर्स बंक मारली, त्याचं कुठलं कुठलं कम्प्लिशन राह्यलं आहे, हे
मनूला बरोबर समजायचं. मग ती त्याच्या मागे लागून ते सारं करून घ्यायची.
या साऱ्या गोष्टी त्या दोघांच्या घरीही माहीत होत्या. म्हणूनच अम्याची तक्रार मनूकडे आणि मनूची अम्याकडे व्हायची. दोघांनी घरी स्पष्ट सांगितलं नसलं, तरी त्यांना कळत नव्हतं असं नाही. आणि त्यांचीही ना नव्हतीच! लहानपणापासून पाहात आले होते ते दोघांना… अगदी “मेड फॉर इच अदर…’
मग आता हे अचानक झालं काय, हे राहुलला समजेच ना… अर्थात जिथं अम्यालाच काही समजलं नव्हतं, तिथं राहुलला काय समजणार होतं? तरी राहुल विचार करतच होता; कारण तिच्या आणि त्याच्या अशा दोघांच्याही ग्रुपला त्यालाच उत्तर द्यायचं होतं. दोघांचा बेस्ट फ्रेंड होता तो. ते इतरांना “झाशा’ देऊन हुंदडायला गेले, तरी त्याला मात्र खरंखरं सांगून जायचे. एकदा तर त्याला मनूच्या वडिलांनी विचारलंही होतं… “अरे त्यांना म्हणाव सांगून टाका ना एकदा आम्हाला स्पष्ट. आम्ही काय नाही म्हणणार आहोत का? असे किती वर्षं फिरणार आहात नुसतेच. आमच्या नातेवाइकांनाही माहितीये सगळं. एकदा अक्षता टाकल्या, की आम्ही मोकळे… तू बोल रे त्यांच्याशी…’
राहुलपुढे हा एकच प्रश्न सतत उभा राहात होता, “हे अचानक काय झालं?’
दोन महिन्यातच मनूचं लग्न झालं. अम्या घरचं कार्य असल्यासारखा राबला त्या लग्नात. राहुलला, त्याच्या ग्रुपला, एवढंच काय पण तिच्या घरच्यांनाही बघवत नव्हतं त्याच्याकडे. तो आणि मनू एकमेकांसमोर यायचं टाळत होते. तसे आले असते, तर बांध नक्कीच फुटला असता… लग्न लागलं. पंगती बसल्या. सगळा ग्रुप शेवटच्या पंगतीत बसणार होता. तेव्हा अम्या बाहेर सटकला. पंगत उठली, तरी हा काही दिसला नाही कोणाला. मनूची नजरही त्यालाच शोधत होती. तो उपाशी राहिलेला तिला अजिबात चालायचा नाही… पण अम्या उगवला तो थेट पाठवणीच्या वेळी. अर्थात जेवला का नाहीस, हे विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, मनूचीदेखील… पाठवणीच्यावेळी मनू त्याच्यासमोर आली. नवऱ्याशी ओळख करून दिली. हा अम्या. माझा सगळ्यात जवळचा मित्र… त्यावेळी दोघांच्याही कंठात हुंदका अडला होता… फक्त दोघांच्याच नाही… त्यांना ओळखणाऱ्या साऱ्यांच्याच….
अम्याला सावरायला काही दिवस लागले. मनूला तेवढा तरी वेळ मिळाला की नाही ठाऊक नाही… मनू हनिमूनहून परत आली. आल्याआल्या तिनं पहिला फोन अम्यालाच लावला. तो सापडला नाही म्हणून राहुलला. अर्थात लग्नानंतर ती राहुलच्या संपर्कात होतीच. तिला अम्याची काळजी वाटत होती… पण अम्या काही तिला भेटायला तयार नव्हता. तिनंही त्याला वेळ दिला. शेवटी तिच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनंतर ते भेटले… त्याच नेहमीच्या जागी… नंतरही ते भेटत राहिले. अम्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा तिनं आता चंगच बांधला होता. त्याला कोणती मुलगी शोभेल, हे तिच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार होतं?
पुढे अम्याही निवळला. त्याचंही लग्न झालं. आज अम्या आणि मनू आपापल्या संसारात रमले आहेत. दोघांनाही पोरंबाळं आहेत. भेटीगाठी आता खूपच कमी झाल्यात. म्हणजे सहा-सात महिन्यांतून एखादेवेळी वगैरे… तेव्हा मोबाईल नव्हते. आता आहेत. पण रोज फोन किंवा एसएमएसही नसतो. त्या दोघांना तशी गरजही नाही. ती दोघंही त्यापलीकडे कधीच गेली आहेत. आजही त्यांना एकमेकांबद्दल उत्तम माहिती असते. आपापल्या जोडीदारांशी ते प्रामाणिक आहेत. कदाचित काहींना शंका येते, त्यांच्या “इतर’ संबंधांबद्दल… अर्थात त्याबाबत इतरांना दोष देण्यातही अर्थ नाही. 12-14 वर्ष एकत्र राहिलेल्यांमध्ये असे संबंध निर्माण झाले नसतील, यावर कोण विश्वास ठेवणार? पण विश्वास ठेवायला हवा. ते दोघंही एकमेकांच्या मनामध्ये इतके गुंतले होते, की त्यांना या गोष्टी खरोखरच दुय्यम वाटत होत्या. कधीकधी ते दोघं तिच्या किंवा त्याच्या घरी एकटेही असत; पण गाणी, गप्पा किंवा मारामाऱ्या याशिवाय दुसरं काही त्यांच्यात घडलं नाही… कोणी यावर विश्वास ठेवो, न ठेवो, राहुल, त्या दोघांचा ग्रुप आणि माझा मात्र पक्का विश्वास आहे. आम्ही सारे त्यांचं तर उदाहरण सांगायचो साऱ्यांना… आजही सांगतो… हे असं का झालं, हे अजूनही साऱ्यांनाच कोडं आहे. अम्यानं तिला हा प्रश्न आजही विचारलेला नाही आणि ती आपणहून सांगेपर्यंत त्याला समजणारही नाही… अर्थात त्याला समजल्यानंतरही तो आम्हाला सांगेल, असंही नाही…
एवढ्या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी या साऱ्याचा साक्षीदार आहे. हे सारं माझ्यासमोर घडलंय… मी ते माझ्या परीनं अनुभवलंय. मागे संदीप खरेच्या कार्यक्रमाला गेलो होतो… तेव्हा एक गाणं ऐकलं
कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे, अपुले अंतर…
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्या नंतर…
या दोघांना किती चपखल लागू होतं नाही…
ही गोष्ट अनेक दिवस मनात होती. सांगावीशी वाटत होती. अम्या आणि मनूच्या सफल न झालेल्या (खरंतर असं कसं म्हणणार? लग्नात परिवर्तन न झालेल्या, असं म्हणता येईल फारतर…) प्रेमाची ही कहाणी आहे. कोणालातरी वाटेल, की ते दोघं आपापल्या जोडिदारांना फसवत असतील. तर तसंही नाही. आपापला संसार ते उत्तम रीतीनं करतात. आपापल्या संसाराला ते 100 टक्के देतात… आपलं प्रेम त्यांनी मनाच्या कुठल्यातरी खोल कप्प्यात अगदी अंधारात ठेवलंय एवढंच…
आज इतक्या दिवसांनी मला हे सांगावंसं का वाटलं ठाऊक आहे? ते दोघं पहिल्यांदा भेटले, त्याला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली. आम्ही सारे, म्हणजे आमचा ग्रुप त्या दिवशी भेटतो. अगदी पहिल्यापासूनचा रिवाज आहे हा. नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही भेटलो, प्रचंड दंगा केला. ती दोघंही हे सारं छान एन्जॉय करत होती. नेहमीप्रमाणे सारं वातावरण होतं. जाताना मात्र ती आमचीही नजर चुकवून चटकन निघून गेली… डोळे पुसत होती, असं प्राजू म्हणाली… इकडं अम्याचेही डोळे पाणावले होते… राहुलनं सांगितल्यामुळे मलाही माहीत होतं, म्हणून त्याला सहज विचारलं, “अम्या, त्या पासबुकाचं काय झालं रे?’ अम्या म्हणाला, “मी अजूनही तिच्याकडे पैसे पाठवतो. तीदेखील तिची भर घालून ते पैसे त्याच अकाउंटमध्ये ठेवते… अरे आमचं झालं नाही म्हणून काय झालं… आम्ही ठरवलंय पैसे साठवत राहायचे आणि एखाद्याचं पैशांमुळे अडत असेल, तर त्याला न बोलता देऊन टाकायचे… तिच्या एका मैत्रिणीला अडचण होती, तेव्हा आम्ही त्या कपलला ते पैसे देऊन टाकले. आमचा नाही झाला संसार… पण दुसऱ्याचा उभा राहू शकला, याचा आनंद आहेच की!!!
रविवार, ३ जानेवारी, २०१०
जरुर वाचावे
"खर्च झाल्याचं दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो..."
"सुखाचे क्षण पायाप्रमाणे असतात.
हातात आलेसे वाटतात तेव्हा निसटून गेलेले असतात."
"आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो."
"सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!"
"प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मुल्यमापनाईतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, तर काहींची नंतर!"
Nice Love Story - Salty Coffee
He met her on a party, she was so outstanding, manyguys chasing after her,while he was so normal, nobody paid attention to him. At the end of the party, he invited her to have coffee with him, she was surprised, but due to being polite, she promised.
They sat in a nice coffee shop, he was too nervous tosay anything,she felt uncomfortable, she thought, please, let meback home..suddenlyhe asked the waiter: would you please give me some salt?
I'd like to put it in my coffee.
Everybody stared at him, so strange! His face turnedred, but, still, he put the salt in his coffee and drank it.She asked him curiously: why you have this hobby?He replied: when I was a little boy, I was livingnear the sea, I liked playing in the sea, I could feel the taste of the sea, salty and bite, just like the taste of the salty coffee. Now every time I have the salty coffee, I always think of mychildhood, think of my hometown, I miss my hometownso much, I miss my parents who are still living there. While saying that, tears filled his eyes.
She was deeply touched. That's his true feeling, fromthe bottom of his heart. A man who can tell out his homesick, he must be a man who loves home, cares about home, has responsibility of home..Then she also started to speak, spoke about her faraway hometown, her childhood, her family. That was a really nice talk, also a beautiful beginning oftheir story.
They continued to date. She found actually he was aman who meets all her demands: he had tolerance,was kind hearted, warm, careful...he was such a good person but she almost missed him! Thanks to his salty coffee!
Then the story was just like every beautiful lovestory: the princess married to the prince, then they were living the happy life...And, every time she made coffee for him, she put some salt in the coffee, as she knew that's the way he liked it.
After 40 years, he passed away, left her a letterwhich said: My dearest, please forgive me, forgive my whole lifelie. This was the only lie I said to you----the salty coffee. Remember the first time we dated? I was so nervous at that time, actually I wanted some sugar, but I said salt. It was hard for me to change so I just went ahead. I never thought that could be the start of our communication! I tried totell you the truth many times in my life, but I was too afraid to do that, as I have promised not to lie to you for anything..Now I'm dying, I afraid of nothing so I tell you the truth:I don't like the salty coffee, what a strange bad taste..but I havethe salty coffee for my whole life since I knew you, I never feel sorry for anything I do for you. Having you with me is my biggest happiness for my whole life. If I can live for the second time, I still want to know you and have you for my whole life, even though I have to drink the salty coffee again.
Her tears made the letter totally wet.Someday, someone asked her: what's the taste of saltycoffee?
It's sweet. She replied.
Take care ...
"When People Come Together, they find ways to Separate".
यह प्यार भी बडी अजीब चीज़ हैं..
ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं..
"अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला.
त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...
बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही.
ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.
तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता.
आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं.
त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.
"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला.
आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!!
म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन!
मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं.
येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"
तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..
-----------
"शेखर, क्या तुमने कभी किसी लडकी से प्यार किया हैं?"
"हां! हैं एक लडकी, बिलकुल तुम्हारे जैसी, बहुत सुंदर, बहुत भोली.. और थोडी पागल भी.. लेकिन मेरे प्यार की खबर सिर्फ मेरे दिल को हैं.."
"उसे बताया क्यों नहीं?"
"यह प्यार भी बडी अजीब चीज़ हैं संजना.. जहां इकरार की पुरी उम्मीद हो, वहां भी यह दिल कहने से डरता हैं..और मुझे तो इनकार क पूरा यकीन हैं.. अब, तुमही कहो.. वह किसी और को चाहती हैं.. बहुत चाहती हैं.."
जब किसी की तरफ दिल झुकने लगे
एक छान गाणं खूप, खूप दिवसांनी ऐकलं.. त्यावरुन ही गोष्ट...
एक प्रेम कथा.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.
ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."
आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."
ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.
लव्हॉलॉजीची एबीसीडी
' ए ' : अॅट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण
प्रेमाची सुरुवात त्याच्या / तिच्याकडे आकषिर्त झाल्यामुळे होते , हे वेगळं सांगायची गरज आहे का ?
' बी ' : बॅचलर
ही डिग्री गमावून बसण्याच्या प्रक्रियेला प्रेमानेच तर सुरुवात होते . काहींच्या आयुष्यात हा क्षण वारंवार येतो , तर काहींच्या आयुष्यात हा योग लग्नानंतरच येतो .
' सी ' : क्यूट
तो / ती प्रत्येक क्षणी क्यूट वाटायला लागली की तुम्हाला प्रेमाचा फिवर चढलाच समजा .
' डी ' : डिच म्हणजेच फसवणं
प्रेमात कुणी दुस - याला डीच केलं तर त्या व्यक्तीने कधीच तिच्यावर प्रेम केलं नव्हतं , असं समजावं .
' ई ' : इगरनेस म्हणजेच तीव्र इच्छा
भेटणं , पाहणं , बोलणं अशा त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची तीव्र इच्छा दडलेली असते .
' एफ ' : फ्लावर अर्थातच फुलं
प्रपोज करायचंय , राग घालवायचाय , खुश करायचंय , सरप्राइज द्यायचंय ... तुम्हाला काय करायचं , हा पेच पडला की छानशी फुलं विकत घ्यायची . अर्धा प्रॉब्लेम तिथेच सोडवता येतो .
' जी ' : गिफ्ट
हल्ली गिफ्ट हे प्रेम मोजण्याचं उत्तम परिमाण झालं आहे . त्यातील दिखाऊपणाचा भाग वगळला तर हा प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय होऊ शकतो .
' एच ' : हॉट
फिलिंग हॉट , हॉट , हॉट . प्रेमातील एक हॉट फिलिंग काही काळानंतर पर्सनॅलिटीमधूनही दिसून येतं . त्याला / तिला आवडेल म्हणून खूप छान म्हणजे आजच्या भाषेत हॉट दिसण्याचा प्रयत्न केला जातो .
' आय ' : इलू
' सौदागर ' चित्रपटाने काय दिलं , असं विचारलं तर इतका कठीण प्रश्न का विचारता , असा प्रतिप्रश्न विचारला जाईल . ' आय लव्ह यू ' चा शॉटफॉर्म यातून प्रसिद्ध झाला . आज एसएमएस करताना या शॉर्ट आणि स्वीट शब्दाचा
वापर केला जातो .
' जे ' : जेलस म्हणजेच मत्सर
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल , यावरून जेलसीची तीव्रता लक्षात येते . प्रेमात पडल्यावर आपल्या मनात मत्सर भावना दडली आहे , हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही .
' के ' : किस्स
कधीही न विसरता येणारे ते नाजूक क्षण .
' एल ' : लव्ह म्हणजेच प्रेम
लव्हॉलॉजी विषयाचा पाया याच संकल्पनेने रचला गेला आहे . जगातील संपूर्ण साहित्यात याची परिपूर्ण व्याख्या मिळणं कठीण , यावरून या शब्दाची व्याप्ती तुम्हाला कळू शकते .
' एम ' : मनी म्हणजेच पैसा
प्रेमाने पोट भरत नाही , हे कळण्याचा टप्पा आणि त्यावरचं उत्तर म्हणजे पैसा .
' एन ' : नॉटी म्हणजेच खोडकर
माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे ... हे खूपचं बोअरिंग वाटतं ना ! इथेच या नात्यात थट्टा - मस्करीचा प्रवेश होतो . पण हे जरा जपून .
' ओ ' : ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी
उम्मीद पर ही दुनिया कायम है ... असं प्रेमात पडल्यावर वारंवार बोलावं लागतं . ती आपला निर्णय घरी कळवते , तुम्ही पहिल्यांदा तिच्या घरी जाता असा प्रसंग वेगळा असतो , पण मदतीला येणारा आशावाद तोच असतो .
' पी ' : फिजिक्स
हल्ली फिजिकल केमिस्ट्री , गेटिंग फिजिकल , असे शब्द वापरले जातात . शारीरिक आकर्षण हे त्याचं मूळ आहे . पण हा मुद्दा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो .
' क्यू ': क्वीन
तिला कायम राणीसारखं मानावं लागतं . तिच्या कोणत्याही इच्छेचा अवमान केलेला चालत नाही . शेवटी तिला तुमच्या हृदयाचं सम्राज्ञीपद द्यावंच लागतं , प्रेमातील ही एक अपरिहार्य गोष्ट आहे .
' आर ' : रोमान्स म्हणजेच अद्भुत किंवा रम्य अनुभव
रोमॅण्टिक व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधात प्रेमाचे रम्य रंग भरण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाही , तर काहींच्या आयुष्यात नियोजन करूनही असं रोमॅण्टिक घडत नाही . लक फॅक्टर इथे मोठी भूमिका बजावतो .
' एस ' : स्वीट
प्रेमात पडल्यावर प्रत्येक गोष्टीला स्वीट हा शब्द जोडायला विसरायचं नाही . प्रेमात हार्ट , ड्रीम्स असं सगळंच न सांगता स्वीट होऊन जातं .
' टी ' : टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती .
प्रेम आणि सहनशक्ती असे एकाच नाण्याचे दोन पैलू असतात , हे अनुभवावरून लक्षात येईल . इथे तुम्ही कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारलेली असते . त्यामुळे जितकी सहनशक्ती तुमच्याकडे जास्त तितका प्रेमाची गोडी अधिक वाढते .
' यू ' : ' अस ' म्हणजेच आम्ही
प्रेम निव्वळ स्वत : चा विचार करणारी संकुचित विचारसरणी सोडायला भाग पाडतं . हीच प्रेमाची जादू असेल .
' व्ही ' : व्हीक्टरी म्हणजेच जिंकणं
तिचं / त्याचं हृदय जिंकणं हे तुम्ही हृदय हरल्याशिवाय शक्य होत नाही . हा अजब व्यवहार इथे आवडीने करावा लागतो .
' डब्ल्यू ' : विल म्हणजेच इच्छाशक्ती
प्रेमात खूप काही सिद्ध करून दाखवावं लागतं . त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी तुम्हाला इच्छाशक्तीतून मिळते .
' एक्स ' : एक्स - बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड
हे अक्षर आधीच्या प्रेमातील नात्यांचं वर्णन करताना मदतीला धावून येतं .
' वाय ' : यंग
तुम्ही यंग अॅट हार्ट असाल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमात पडण्याचं दिव्य करता येतं .
' झेड ' : झील म्हणजेच आस्था
तो दूर का असेना , पण सुखात असावा . ती कुठेही राहो , खूष राहावी . ही आस्थाच त्या प्रेमवेड्या दोन जीवांना जपत असते .